WOMEN’S TRI-NATION ODI SERIES IN SRI LANKA 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका महिला, भारत महिला आणि श्रीलंका महिला हे तीन संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा श्रीलंकेत भरवण्यात आली आणि सर्व सामने अत्यंत चुरशीचे ठरले.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका महिला संघावर दणदणीत विजय
या मालिकेचा अंतिम सामना भारत महिला आणि श्रीलंका महिला संघामध्ये कोलंबो येथील R. Premadasa Stadium वर खेळवण्यात आला. दोन्ही संघांनी फाइनलसाठी प्रभावी प्रदर्शन करत प्रवेश मिळवला होता.
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 मधील श्रीलंकेत पार पडलेल्या त्रिकोणी वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी करत अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव केला. हा विजय केवळ मोठ्या धावांनीच नाही, तर संपूर्ण टीमच्या संतुलित कामगिरीमुळे मिळाला.
भारतीय संघाने संपूर्ण मालिकेत आक्रमक फलंदाजी, काटेकोर गोलंदाजी आणि सुसंघटित खेळ दाखवला. या स्पर्धेने महिला क्रिकेटला एक नवीन उंची दिली आणि प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवला. भरतासाठी हि एक गौरवाची गोष्ट आहे.
स्मृती मंधानाची शानदार बॅटिंग – भारताने रचला श्रीलंके पुढे धावांचा डोंगर
भारताने नाणेफेक गमावून फलंदाजीची सुरुवात केली. भारतीय टीम ची सुरवात छान झाली आणी सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूने आक्रमक पवित्रा घेतला होता . सलामीवीर स्मृती मंधाना हिने अवघ्या 101 चेंडूंमध्ये 116 धावांची लाजवाब खेळी केली.
स्मृती ने हरलीन देओल (47) सोबत विचारपूर्वक खेळ करून 120 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्स (44 धावा फक्त 29 चेंडूंमध्ये) आणि हरमनप्रीत कौर (41 धावा फक्त 30 चेंडूंमध्ये) यांनी धावगती चांगलीच वाढवली.
शेवटी भारताने 50 षटकांत 342/7 अशी भली मोठी धावसंख्या उभारली आणी विशेष म्हणजे ही या संपूर्ण मालिकेतील सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
श्रीलंकेच्या डावाची खराब सुरुवात झाली – भारताचा अचूक गोलंदाजीचा मारा
भारताची बॅटिंग झाल्यानंतर श्रीलंकेच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताच्या अमानजोत कौर हिने पहिल्याच spell मध्ये दोन्ही सलामीवीरांना बाद करत श्रीलंकेला दडपणाखाली आणले.
श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू हिने श्रीलंके कडून सर्वात जास्त 51 धावा ठोकल्या आणि निलाक्षिका सिल्वा 48 . या जोडीने श्रीलंके साठी थोडीशी झुंज दिली. पण भारताच्या शिस्तबद्ध आणी अचूक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
भारताच्या फिरकीपटू स्नेह राणा हिने 10 षटकांत 4 विकेट घेत 38 धावा दिल्या. तिच्या जोडीने श्री चरणी ने देखील मोक्याच्या क्षणी विकेट घेतली आणी
श्रीलंका टीम अखेर 48.2 षटकांत 245 धावांत सर्वबाद झाली.
सामन्याच्या प्रमुख खेळाडू
Player of the Match – स्मृती मंधाना
आजच्या फायनल मॅच ची प्लेअर ऑफ द मॅच स्मृती मंधाना ठरली ती म्हणाली – “आज खूप गरम होतं, त्यामुळे फारसं बोलायला मन नव्हतं. पण आमची नेहमीची योजना असते – परिस्थिती बघा आणि नंतर त्यानुसार खेळा. त्यांच्या गोलंदाजांनी चांगलं बॉलिंग केलं, त्यामुळे आम्हालाही संयम दाखवावा लागला.”
Player of the Series – स्नेह राणा
पूर्ण सिरीज मध्ये शानदार कामगिरी करणारी स्नेह राणा ही प्लेअर ऑफ द सिरीज ठरली ती म्हणाली – “संघासाठी योगदान देऊन खूप समाधान मिळालं. सरावात मी माझ्यावर खूप मेहनत घेतली होती. गोलंदाजी कोचसोबत झालेली चर्चा माझ्यासाठी खूप उपयोगी ठरली.”
भारताची एकात्मता आणि ताकद
या विजयामुळे भारतीय महिला संघाची ताकद आणि संघबांधणी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. सर्व खेळाडूंनी आपली भूमिका योग्य पार पाडली – फलंदाजीत आक्रमकता, गोलंदाजीत अचूकता आणि क्षेत्ररक्षणात चिकाटी. हा विजय केवळ एक सामना नव्हता, तर पुढील ICC स्पर्धांसाठी टीम इंडिया किती सज्ज आहे, हे दाखवणारा इशारा होता.
भारताचा महिला संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी 2025 ची त्रिकोणी मालिका जिंकून स्वतःचा आत्मविश्वास उंचावला आहे. स्मृती मंधाना आणि स्नेह राणा यांची कामगिरी संपूर्ण मालिकेत लक्षवेधी ठरली. या विजयाचा उपयोग आगामी मोठ्या टूर्नामेंट्ससाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी नक्कीच होईल.
READ MORE
जपानच्या सुमितोमो कंपनीने YES बँकेमध्ये घेतला २०% हिस्सा – १३,४८३ कोटी रुपयांची गुंतवणूक
कात्रज प्राणीसंग्रहालय पुणे – वेळ, तिकीट आणि महत्त्वपूर्ण माहिती
ChatGPT कोणता कंटेंट तयार करत नाही? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या मर्यादा