केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून २५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.
रोड अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस
पुणे : भारतात दरवर्षी हजारो छोटे मोठे रोड अपघात होत असतात आणी त्यामध्ये शेकडो नागरिक आपला जीव गमावतात. बऱ्याचवेळा अपघातानंतर मदतीच्या प्रतीक्षेत वेळ जातो आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते.
याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये म्हणजेच अपघातानंतरच्या पहिल्या तासात जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देणाऱ्या आणी त्यांचा जीव वाचवणाऱ्यांना आता थेट २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
‘गोल्डन अवर’ म्हणजे काय ?
रोड अपघाता नंतर अपघातानंतरचा पहिला तास, वैद्यकीयदृष्ट्या फार महत्त्वाचा असतो , या वेळेत अपघात झालेल्या व्यक्ती ला जर तात्काळ उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. म्हणूनच अपघातानंतरचा पहिला तास “सुवर्णक्षण” मानला जातो. या वेळेत जो नागरिक अपघातग्रस्तांना मदत करेल त्यांना “राहवीर” असे संबोधले जाणार आहे.
राहवीरांचा सन्मान कसा होणार ?
ज्या व्यक्तींनी अपघातस्थळी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले किंवा वैद्यकीय मदतीसाठी सक्रियपणे पुढाकार घेतला, अशा मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून २५,००० रुपयांचे रोख बक्षीस आणि गौरवचिन्ह (प्रमाणपत्र) देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे समाजात जबाबदारीची भावना आणि मदतीसाठी तत्परता वाढेल, असे प्रशासनाचे मत आहे. अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये दिलेली मदत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे अशा ‘राहवीर’ नागरिकांना सन्मानित करून इतरांनाही प्रेरणा देण्याचा सरकारचा हेतू आहे. यामुळे अपघातातील मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“राहवीर”ची निवड कशी होणार?
या उपक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य शल्यचिकित्सक, आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांचा समावेश आहे.
जेव्हा अपघात घडतो, तेव्हा पोलिसांकडून राहवीरांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर समिती त्या व्यक्तीच्या कृतीचे मूल्यांकन करून त्याची पात्रता निश्चित करेल.
पात्र राहवीर कोण?
- अपघातस्थळी उपस्थित राहून जखमींना रुग्णालयात दाखल करणारा
- कोणताही आर्थिक हेतू नसलेला स्वयंसेवक
- अपघातग्रस्ताच्या जीवित रक्षणासाठी तत्काळ उपाययोजना करणारा
याशिवाय, संबंधित व्यक्तीच्या कृत्यामुळे रुग्णाचा जीव वाचल्याची शक्यता असल्यास, त्याला प्राधान्याने ‘राहवीर’ म्हणून निवडले जाईल.
राहवीर उपक्रमामागचा सरकारचा उद्देश
सरकारचा राहवीर उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजात सकारात्मक आणि मदतीची भावना निर्माण करणे आणि नागरिकांना अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करणे.
अनेकदा लोक अपघात पाहूनही मदत करत नाहीत, कारण त्यांना पोलिस चौकशी, कोर्टाचे झंझट किंवा कायदेशीर अडचणींची भीती वाटते. पण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा मदत करणाऱ्या व्यक्तींना कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा त्रास दिला जाणार नाही.
उलट, त्यांचा सन्मान करण्यात येईल. हा उपक्रम लोकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करेल आणि अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
निष्कर्ष – ‘गोल्डन अवर’मध्ये मदत करणाऱ्या राहवीरांसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस ही योजना केवळ प्रोत्साहन नाही, तर समाजात आपुलकी आणि माणुसकी वाढवणारा एक आदर्श उपक्रम आहे. या उपक्रमामुळे अपघातातील मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल आणि एक सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. राहवीर बक्षीस योजना कोण चालवते?
ही योजना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport & Highways) द्वारे राबवली जाते.
2. बक्षीसासाठी अर्ज कधी आणि कसा करायचा?
अर्ज करण्याची गरज नाही. अपघाताची नोंद झाल्यावर पोलिस विभाग आणि जिल्हा प्रशासन स्वतःहून संबंधित व्यक्तीचा तपशील समितीकडे पाठवतात.
3. मदत करणाऱ्याला कायदेशीर अडचणी येतात का?
नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की मदत करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. उलट त्यांचा सन्मान केला जाईल.
4. हा उपक्रम कोणत्या राज्यांमध्ये लागू आहे?
हा उपक्रम संपूर्ण भारतात लागू आहे, आणि सर्व राज्यांत सरकार त्याची अंमलबजावणी करत आहे.
5. राहवीर योजनेसाठी अधिक माहिती कुठे मिळेल?
तुमच्या जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, किंवा आरटीओ कार्यालयात योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकते. तसेच morth.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपशील उपलब्ध आहे.
READ MORE