तळेगाव दाभाडे, १५ जून २०२५ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा परिसरात असलेला एक जुना पदचारी पूल कोसळल्याने अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळन्याची घटना कशी घडली?
सुमारे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, तळेगाव दाभाडे जवळील कुंड मळा येथे असलेला जुना पूल अचानक कोसळला. हा पूल पर्यटक व भाविकांच्या वर्दळीने खचाखच भरलेला होता. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीचे पाणी पातळीवरून वाहत होते आणि प्रवाहही तीव्र होता. त्यामुळे पूल कोसळताच अनेक लोक पाण्यात कोसळले आणि प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे.
बचाव कार्य सुरु
दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिस, आपत्ती निवारण पथक (NDRF), अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. मात्र नदीचा जोरदार प्रवाह आणि चिखलयुक्त पाणी यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.
अद्याप किती लोक बेपत्ता?
अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नसली तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार १५ ते २० लोक पूल कोसळल्याच्या वेळी त्यावर उपस्थित होते. यापैकी अनेकजण अद्याप सापडलेले नाहीत.
पायाभूत सुविधा आणि देखभाल याकडे दुर्लक्ष?
कोसळलेला पूल अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आला होता आणि गेल्या काही वर्षांपासून तो कमकुवत असल्याचे स्थानिकांनी वारंवार सांगितले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांचे आरोप: “हा पूल अगदी जीर्ण झाला होता. आम्ही अनेक वेळा प्रशासनाला कल्पना दिली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं,” — स्थानिक रहिवासी.
दुर्घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
दुर्घटनेच्या वेळी पुलावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी आरव देशमुख यांनी सांगितले:
“अचानक पूल खचल्याचा आवाज आला आणि काही कळायच्या आत अनेक लोक पाण्यात पडले. काही लोक काठाला पोहचले पण अनेकजण वाहून गेले.”
महाराष्ट प्रशासनाची प्रतिक्रिया
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिक माहिती मिळाली असून, बचाव व शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तात्पुरती मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुढील अपडेट्स – तपास आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांची किंवा बेपत्तांची नेमकी संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. अधिकृत निवेदन लवकरच अपेक्षित आहे.

जुन्या पुलांसाठी सुरक्षितता व उपाययोजना आवश्यक
ही दुर्घटना स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारसाठी एक गंभीर इशारा ठरली आहे. अशा जुन्या, जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या पुलांची तात्काळ पाहणी, ऑडिट आणि सुरक्षा मूल्यांकन करणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता ही प्राथमिकता असावी लागते.
राज्यभरात असलेल्या सर्व जुन्या पुलांची यादी तयार करून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट तज्ज्ञांमार्फत करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी धोका ओळखला जातो, त्या पुलांना तात्पुरते बंद करणे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे हाच उपाय आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि नियमित देखभालीवर भर देणं आवश्यक आहे.
सामाजिक जबाबदारीने आणि त्वरित कृतीनेच अशा दुर्घटनांना प्रतिबंध करता येऊ शकतो. प्रशासनाने नागरिकांचा जीव धोक्यात न घालता यावर तातडीने ठोस पावले उचलावीत.
पुणे, महाराष्ट्र | इंद्रायणी नदीवर कुंडमळा गावाजवळील पुल कोसळला. हा परिसर पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. अंदाजे १० ते १५ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.- विडिओ साठी क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1: ही दुर्घटना कुठे घडली?
➡️ ही दुर्घटना तळेगाव दाभाडे जवळील कुंड मळा, मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर घडली.
Q2: पूल कोसळण्याचे कारण काय होते?
➡️ पूल जुनाट होता आणि गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह खूप वाढला होता. तसेच पुलावर पर्यटकांची गर्दीही होती.
Q3: बचाव कार्याची स्थिती काय आहे?
➡️ एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य सुरू ठेवून आहेत. प्रवाह अधिक असल्यामुळे अडथळे येत आहेत.
READ MORE
- विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा मुलगा सापडला
- मुंबईत भीषण विमान अपघात – चाचणी उड्डाणादरम्यान विमान कोसळले
- मुख्य पायलट सुमित सबरवाल यांच्या निर्णयाला मानाचा मुजरा