ज्ञानेश्वर महाराज पालखी वारी २०२५ मध्ये आळंदी ते पंढरपूर असा १७ दिवसांचा भक्ती सोहळा. जाणून घ्या ९ खास टप्पे.

वारीची सुरुवात आळंदी येथून १९ जून रोजी होते, जिथून लाखो वारकरी विठोबा भेटीसाठी पदयात्रा सुरू करतात.

२० जून रोजी पालखी पुण्यात पोहोचते. शहरात टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरण निर्माण होते.

२२ व २३ जून रोजी वारी सासवड मार्गे पुढे जाते. येथे अनेक कीर्तन, प्रवचन, आणि हरिपाठ होतात.

२४ जून रोजी पालखी जेऊर गावात पोहोचते. स्थानिक लोकांच्या सेवाभावामुळे वारी अधिक भक्तिमय होते.

२६ जूनला लोणंद येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीची ज्ञानेश्वर पालखीसोबत भक्तिभेट होते. हा सोहळा खास असतो.

२८ जून रोजी फलटणमध्ये पालखी थांबते. येथे वारीचे भव्य स्वागत होत असून कीर्तन सोहळ्यांची रेलचेल असते.

०१ जुलै रोजी पालखी माळशिरम येथे पोहोचते. थकलेल्या वारकऱ्यांना येथे भरपूर सेवा, अन्नदान दिले जाते.

०४ जुलै रोजी पालखी वाखरी येथे विसावते. पंढरपूर जवळ आल्याने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचतो.

०५ जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. विठोबा रुख्मिणीच्या दर्शनाने वारीचा भक्तीमय समारोप होतो.